
About
Send us Fan Mail
आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी असे विचार येतात, की ते कुणाला सांगायचं ही धाडस होत नाही. मग वाटतं, "आपण इतके वाईट आहोत का? मनात असे विचार आले म्हणजे आपण पापी ठरलो का?"
हाच प्रश्न एका शिष्याच्या मनाला इतका पोखरत होता की तो थेट गुरुदेवांकडे गेला आणि म्हणाला, "मला शिक्षा द्या!"
पण गुरुदेवांनी शिक्षा केली नाही. ते त्याला एका विषारी रोपट्यापाशी घेऊन गेले आणि एक असा प्रश्न विचारला, ज्यामुळे शिष्याच्या डोळ्यांत क्षणात प्रकाश पडला.
तो प्रश्न नेमका काय होता?