
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 15th May 2026
सुप्रभात, दत्तप्रभूंच्या कार्यामध्ये पांडुरंग गाभाऱ्याबाहेर आला व कृष्णाचे रूप त्याने खेळ सुरू केला. जीवाचा जीवभाव उघडा पडावा यासाठी हा खेळ होता. पण जीव बिलंदर. जीवभाव झाकतच तो खेळाचे सुख घेऊ लागला. म्हणून भक्तीच्या आनंदापासून वंचित राहिला. खेळाचे मूळ उद्दिष्ट ज्यांच्या लक्षात आले तेचि भक्त भाग्यवंत ठरले. मला ते भाग्य लाभेल का ? जय परमानंद .
सुप्रभात, हृदयात उचंबळणारा आनंद बाह्यांगाने अनुभवण्यासाठी नारायणाने द्वैताची निर्मिती केली. आपल्याच अंशाभोवती मानवी देहाची चौकट निर्माण केली व जीवाचा जन्म झाला. नारायणाने खेळात जीवाला सामावून घेतले व जीव मोहरला. नारायणाचा हा खेळ अनंत काळापर्यंत चालणार आहे पण जीवाला मात्र देहाच्या अस्तित्वापर्यंतच या खेळाचा आनंद घेता येणार आहे. तेव्हा विद्यमान देह असेपर्यंत प्रभूंच्या सहवासाचा सर्वांगाने आनंद घ्यावा व लुटावा हेच स्वधर्माचरण आहे. जय परमानंद 🙏🙏🙏